कावळे किती ?
काही वेळा बादशहा असे काही विचित्र प्रश्न विचारायचा, की साऱ्यांची भंबेरी उडायची आणि मग त्यांच्या नजरा बिरवलाच्याकडं वळायच्या, त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता.
त्या दिवशीही तसंच झालं. दरबार भरलेला असताना बादशहानं मध्येच साय्यांना उद्देशून विचारलं, "आपल्या हथा दिल्ली शहरात किती कावळे आहेत. कोण ताबडतोब सांगू शकेल?"
बादशहाच्या ह्या चमत्कारीक प्रश्नाचं उत्तर कुणाही दरबाऱ्याला देता येईना. ते सारे प्रश्नार्थक नजरेनं बिरबलाकडं पाहू लागले.
आपल्या प्रश्नानं सारा दरबार स्तंभित झाला आहे हे पाहून बादशहानं आपली नजर बिरबलाकडे वळवली आणि विचारलं, "काय बिरबल, सांगता येईल का तुला आपल्या दिल्ली शहरात कावळ्यांची वस्ती किती आहे ?"
"अगदी सहज," बिरबलाचं उत्तर आलं. सारेच मोठ्या अचंब्यांन बिरबलाकडें पाहू लागले. बिरबल कधी गेला होता दिल्लीतले कावळे मोजायला, त्यांना प्रश्न पडला.
तेवढ्यात बादशहाचे शब्द त्याच्या कानावर पडले, “सांग पाहू बिरबल, दिल्ली शहरात किती कावळे आहेत ते?"
"साठ हजार पाचशे पंचावन्न !" बिरबल पटकन म्हणाला. "अस्सं !" बादशहा उद्गारला, "पण समज, यापेक्षा जास्त कावळे असतील तर ?"
“तसं झालं तर," बिरबल खुलासा करून लागला, "खुदावंत, आपण नक्कीच समजा आपल्या इथल्या कावळ्यांचे दुसरीकडचे नातेवाईक त्यांना भेटायला इथं आले आहेत !"
आणि तू म्हणतोस त्याच्यापेक्षा कमी कावळे असतील तर?" बादशहानं पुढ विचारलं.
"तसं असेल तर," विरवलानं स्पष्टीकरण केलं, "आपल्या इथले कावळे त्यांच्या नातलगांना भेटायला दुसरीकडं गेले आहेत, असं निश्चित समजा. "
बिरबलाच्या या उत्तरानं बादशहासहीत सारे चकित झाले आणि त्यांना कौतुकानं माना डोलावल्या.